बलात्कारी आणि दहशतवाद्यांवर अशीच कारवाई झाली पाहिजे : बाबा रामदेव

 

ramdev 118708 730x419 m

 

मुंबई (वृत्तसंस्था) बलात्कारी आणि दहशतवाद्यांवर अशाच प्रकारची कारवाई झाली पाहिजे. ज्या घटनांबाबत साशंकता असेल त्याबाबतच न्यायालयात जायला हवे, असे म्हणत योगगुरू बाबा रामदेव यांनी हैदराबाद एन्काऊंटरच्या घटनेचे समर्थन केले आहे.

बाबा रामदेव म्हणाले की, अशाप्रकारचे अपराधी हे कलंक असतात. अशा लोकांमुळे संपूर्ण देश आणि धर्म, संस्कृती बदनाम होत असते. जे दुष्कृत्य करतात त्यांच्यासोबत आणि दशतवाद्यांविरोधात त्याच ठिकाणी पोलिसांना, सैन्याला आणि निमलष्करी दलाला अशीच कारवाई करायला हवी. ज्या घटनांबाबत काही साशंकता असेल त्या घटना न्यायालयापर्यंत नेल्या पाहिजेत. त्यावेळीच कायदेशीर प्रक्रियांचा अवलंब केला पाहिजे,असे मत रामदेव बाबा यांनी व्यक्त केले आहे.

Protected Content