धक्कादायक : लग्न जुळत नसल्याने तरूणानं केलं असं काही …नातेवाईकांचा आक्रोश

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील एका गावातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. आपले लग्न होत नाही म्हणून आपल्या जीवन जगावेसे वाटत नाही, अशा जीवनाला काय अर्थ असा विचार करून मनाशी विचार पक्का करून गळफास घेवून आत्महत्या केल्याचा धक्कादायक उघडकीला आला आहे. याबाबत मेहुणबारे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रशांत भगवान पाटील (वय-२४, पिलखेडा ता.चाळीसगाव जि.जळगाव) असे गळफास घेतलेल्या तरूणाचे नाव आहे.

चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड गावात प्रशांत पाटील हा परिवारासह वास्तव्याला होता. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. दरम्यान, आपले लग्न होत नाही. शेतकरी असल्याने आपल्याला मुलगी कुणी देत नाही, असा विचार करून हे आपले जीवन जगून काही उपायोग नाही. असे आपल्या मेहुणे योगेश यांना बोलून दाखविले होते. या विवंचनेतून प्रशांत पाटील याने उपखेड शिवारातील गिरणा नदी पात्राजवळील झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. दरम्यान हा प्रकार लक्षात आल्यानंतर नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेवून तातडीने चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले.  हा प्रकार ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजेला उघडकीला आला. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक दिपक नरवाडे करीत आहे.

Protected Content