मुंबई (वृत्तसंस्था) जनतेने आम्हाला जनमत दिले होते, मात्र शिवसेनेने बेईमानी केली. तसेच सत्तेसाठी शिवसेना या थराला जाईल असे वाटले नव्हते, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते पालघरमध्ये झालेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते.
बाळासाहेब ठाकरे यांना शब्द दिला होता की मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जिवावर शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल असा शब्द दिला होता का? असाही प्रश्न फडणवीस यांनी विचारला. तसेच वर्गात पहिला आलेल्या मुलाला बाहेर बसवण्यात आले असाही टोला फडणवीस यांनी लगावला. तर शेतकऱ्यांना विनाअट कर्जमाफीची घोषणा देणार होती मात्र ते आश्वासन ठाकरे सरकारने पाळले नाही, अशीही टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.