शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ आज दुपारी राज्यपालांची भेट घेणार

maharshtra .1573746967

मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. शेतकऱ्यांना तातडीची मदतीसाठी हे शिष्टमंडळ भेट घेत आहे. परंतू यावेळी सत्तास्थापने संदर्भातही राज्यपालांशी चर्चा होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

 

आज दुपारी ३.३० च्या सुमारा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांच्या नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत काही गोष्टी ठरवल्या जातील त्यानंतर हे शिष्टमंडळ साडेचारच्या सुमारास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटणार आहे. आम्ही राज्यपालांकडे शेतकऱ्यांना तातडीची मदत करा हे सांगण्यासाठी जातो आहोत. आम्ही सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी जाणार नाही असेही तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे. एकंदरीत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली असली तरी दुसरीकडे सत्ता स्थापनेच्या हालचाली देखील सुरु आहेत.

Protected Content