शिवसेना-कॉंग्रेस युतीची लवकरच माती होईल : रामदास आठवले

669917 athawale ramdas 071517 770x433
सातारा (वृत्तसंस्था) शिवसेनेने विचारधारा सोडून काँग्रेसशी युती केली आहे. त्यामुळे या युतीची माती होईल. हे सरकार फार काळ टिकणार नाही, अशी टीका केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली. ते सोमवारी साताऱ्यातील पत्रकारपरिषदेत बोलत होते.

 

यावेळी रामदास आठवले यांनी पुढे म्हटले की, राज्यात सरकार चालवताना शिवसेना ही काँग्रेसच्या दबावाखाली वावरत आहे. तसेच महाविकासआघाडीकडून दिली जाणारी कर्जमाफी ही शेतकऱ्यांची फसवणूक असल्याची टीका देखील आठवले यांनी केली आहे. दरम्यान, आज विधिमंडळाच्या प्रांगणात महाविकासआघाडीच्या विस्तारीत मंत्रिमंडळचा शपथविधी पार पडला. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून महाविकासआघाडीच्या ३६ आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली.

Protected Content