शिवसेना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक ; संसदेच्या पहिल्याच दिवशी भाजपाला पकडले कोंडीत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्याबदल्यात शेतकऱ्यांना दिली जाणारी मदत कमी असल्याचे सांगत शिवसेनेने या मुद्यावर लोकसभेत तहकूब करण्याची नोटीस दिली आहे. शेतकऱ्यांना २५ हजार रूपये मदत देण्याच्या मागणीसाठी शिवसेना मोदी सरकारविरोधात आक्रमक झाली आहे. दरम्यान, शिवसेनेने संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपाला कोंडीत पकडले आहे.

 

राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतमालाचे नुकसान झाले आहे. राज्यपालांनी जाहीर केलेली मदत तोकडी असून, शेतकऱ्यांना २५ हजार रूपये मदत देण्याच्या मागणीसाठी शिवसेना मोदी सरकारविरोधात आक्रमक झाली आहे. शिवसेनेच्या सर्व खासदारांनी संसद परिसरात आंदोलन केले. तसेच मदतीसाठी लोकसभेत तहकूब नोटीस दिली आहे. शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी असून अवेळी पावसाने त्यांना किमान २५ हजार रुपये प्रति हेक्टर मदत देण्याची शिवसेनेची मागणी आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात केलेल्या दौऱ्यांच्या वेळी ही भूमिका मांडली आहे. दरम्यान, आजपासून (१८ नोव्हेंबर) संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. तत्पूर्वी शिवसेनेच्या निर्णयानंतर भाजपाने शिवसेना ‘एनडीए’तून बाहेर पडल्याची घोषणा केली. तसेच शिवसेना खासदारांची बसण्याची जागा विरोधी बाकांवर करण्यात आली.

Protected Content