शरद पवारांवर ईडीची कारवाई म्हणजे सरकारची सूडभावना : राहुल गांधी

I can t work wi13168

 

मुंबई (वृत्तसंस्था) शरद पवार यांना केंद्र सरकारकडून टार्गेट केले जात आहे. महाराष्ट्र निवडणुकीला एक महिना बाकी असताना ही कारवाई करण्यात आली, हा राजकीय संधीसाधूपणा आहे, असे ट्वीट राहुल गांधी यांनी केले आहे.

 

भाजपाकडून सूडभावनेने शरद पवारांना लक्ष्य केले जात असल्याची टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या एक महिनाआधी कारवाई करण्यावरुनही त्यांनी सरकारला धारवेर धरले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी)होणाऱ्या चौकशीवरुन सध्या मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी तणावाचं वातावरण आहे. राहुल गांधी यांनी शरद पवारांविरोधात होत असलेल्या कारवाईवरुन टीका करत केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, भाजपाकडून सूडभावनेने लक्ष्य केलेले शरद पवार आणखी एक विरोधी पक्षनेते आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या एक महिना आधी कारवाई केली जात आहे. सरकारच्या सूडभावनेचा निषेध आहे.

Protected Content