पुणे (प्रतिनिधी) अण्णा हजारे यांच्या बद्दल कुठलीही बातमी छापून तरी वाचायची नाही. तसेच त्यांच्या कुठल्याही विषयावर काही बोलायचे नाही असं मी दोन ते तीन वर्षांपूर्वीच ठरवले आहे; असा बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अण्णांवर केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या आढावा बैठकीनंतर पवार पत्रकारांशी बोलत होते.
अण्णा हजारे यांच्या उपोषणाबद्दल त्यांना प्रश्न विचारला असताना त्यांनी अवघ्या मोजक्या शब्दात पवार यांनी हे उत्तर दिले. तर राज्यपालांच्या अभिभाषण प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणावरही त्यांनी सडकून टीका केली. ‘संसदेत भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदीय प्रथा आणि संस्कृतीला हरताळ फासला आहे.