यावल महाविद्यालयात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक २०२०च्या अभ्यासक्रमाच्या धोरणबाबत चर्चासत्र

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाजव्दारे संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्र.प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० बारावी नंतर बदलेला अभ्यासक्रम व पदवी अंतिम वर्षातील विद्यार्थी, प्राध्यापक यांच्याकरिता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जनजागृती करणे व अमलबजावणी करण्यासाठी चर्चासत्र संपन्न झाले. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.एम. डी. खैरनार उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. हेमंत भंगाळे मार्गदर्शन करताना म्हणाले की नवीन शैक्षणिक धोरणातील अभ्यासक्रमाची उपयुक्तता तत्वे कौशल्ययुक्त शिक्षणावर आधारित आहेत. कौशल्ययुक्त समाज हा त्यामागील उद्देश आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच जबाबदारीची जाणीव, मानवी हक्क जोपासण्याचे काम करावे.

कौशल्य युक्त शिक्षण हे आज काळाची गरज बनली आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये संशोधन, चिकित्सक वृत्ती सजग आवश्यक आहे. आज विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात जगाचा ध्यास घेत शिक्षण घेतले पाहिजे. त्यासाठी ५+३+३+४ ही शिक्षण प्रणाली आकारली आहे. तसेच आज भारतामधल्या कोणत्याही विद्यापीठात, महाविद्यालयात शिक्षण घेता येऊ शकते आणि ते नोकरीसाठी ग्राह्य धरले जाऊ शकते, याआधी अशी सुविधा नव्हती असे नमूद करताना डॉ. भंगाळे ह्यांनी कला, विज्ञान व वाणिज्य या शाखेतील प्रथम वर्षातील अभ्यासक्रमात झालेला बदल व विद्यार्थींनी निवडावयाचे विषय याविषयी माहिती दिली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार यांनी नवीन शैक्षणिक धोरण २०२० बद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की नवीन शैक्षणिक धोरणानुसार बदललेला अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी नव्या शैक्षणिक धोरणामध्ये कौशल्यावर आधारीत शिक्षणात महत्त्वाच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. बारावीनंतर शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी आपल्या पध्दतीने कोणताही विषय निवडू शकतात. तीन वर्षे बी. ए. पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर संशोधनाला विशेष स्थान दिले आहे असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ.सुधीर कापडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. प्रतिभा रावते यांनी केले तर आभार डॉ. संतोष जाधव यांनी मानले. या चर्चासत्राच्या कार्यक्रमाला डॉ. प्रल्हाद पावरा, प्रा. संजिव कदम, प्रा. मनोज पाटील, प्रा,सी.के. पाटील उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. नंदकिशोर बोदडे, प्रा.छात्रसिंग वसावे, प्रा. नरेंद्र पाटील,डॉ. निर्मला पवार, डॉ. वैशाली कोष्टी, मिलींद बोरघडे, प्रमोद कदम,यांनी परिश्रम घेतले

Protected Content