संतप्त महिलांचा यावल नगर परिषदेवर मोर्चा

yaval morcha

यावल प्रतिनिधी । शहरात पाणीपुरवठा हा 9 दिवसांनी होत असल्याने डांगपुरा सैय्यद वाड्यातील संतप्त महिलांसह नागरीकांनी आज गुरुवार (दि. 27 जून) रोजी सकाळी यावल नगर परिषदेवर मोर्चा काढण्यात आला आहे.

माहिती अशी की, नगर परिषदच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या डांगपुरा व सैय्यदवाड्यात मागील 9 दिवसांपासून नळांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याने संतप्त नागरीकांनी आज सरळ नगर परिषदकडे मोर्चा काढला आहे. तर नगराध्यक्षा सुरेखा कोळी यांनी सांगितले की, नगर परिषद कडुन शहरात होणारा पाणीपुरवठा हा हतनुर धरणावर अवलंबुन आहे. मात्र हतनुर धरण कोरडा पडल्यामुळे शहराला दोनच दिवस पाणी पुरवठा होईल इतकाच जलसाठा शिल्लक असल्यामुळे, तात्पुरता पाणीपुरवठा करण्यासाठी काही विहीरींचा पर्याय करुया, तसेच गरज भासल्यास काही प्रभागामध्ये टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जाईल, असे आश्वासन यावेळी केले आहे. तसेच या मोर्चात सैय्यद वाडयातील व डांगपुरा परिसरातील आबीद कच्छी, अब्दुल रहीम, इस्हाक कुरेशी, बिलकीस बी, शेख सुभान, कम्रोनिशा बी, सलामा बी, राबीयाबी, सैय्यद अन्वर, सैय्यदवासीफ अली, खैरूनिसा बी, शेख फरजान, सैय्यद फैसल, इम्तीयाज बेगम, मुजफ्फर खान, फारुख शेख, असीम शेख आदी उपस्थित होते.

Protected Content