मुंबई प्रतिनिधी । राज्यपालांचे नावदेखील भगतसिंह असले तरी त्यांनी संविधानाची हत्या केली असल्याचा घणाघाती आरोप आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला.
संजय राऊत आज म्हणाले की, आम्ही काल शक्ती प्रदर्शन केले नाही. आम्ही आमच्याकडे असणारे आमदार एकाच ठिकाणी जमा करून सत्य नेमके काय आहे ते महाराष्ट्रातील जनतेला दाखविले. याप्रसंगी त्यांनी नारायण राणे आणि आशिष शेलार यांच्या वक्तव्यांवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. दरम्यान, त्यांनी राज्यपालांवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, राज्यपालांचे नावदेखील भगतसिंह आहे. एक भगतसिंह हे क्रांतीकारी होते. तर या महोदयांची लोकशाहीची व संविधानाची हत्या केली आहे. त्यांनी भाजपचे सरकार गैरमार्गाने आणण्यासाठी केलेले प्रयत्न हे भयंकर असल्याची टीका त्यांनी केली.