मुंबई प्रतिनिधी । राज्यातील ताज्या घडामोडींबाबत नाराजी व्यक्त करून आपल्या पक्षाने काँग्रेस वर्कींग कमिटी बरखास्त करावी अशी मागणी माजी खासदार संजय निरूपम यांनी केली आहे.
संजय निरूपन यांनी निवडणुकीचा निकाल लागल्यापासूनच शिवसेनेसोबत जाण्याच्या विरोधात होते. यामुळे पक्षाला मोठा फटका बसेल असा इशारा त्यांनी अनेकदा दिला होता. मात्र त्यांच्या सल्ल्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले. या पार्श्वभूमिवर, आज सकाळी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी झाल्यानंतर संजय निरूपन यांनी आपल्या पक्षावर तोफ डागली. ते म्हणाले की, या निर्णयामुळे पक्षाची मोठी हानी झालेली आहे. पक्षाने आपली काँग्रेस वर्कींग कमिटी बरखास्त करण्यात यावी अशी मागणीसुध्दा त्यांनी केली.