भीषण अपघाताने हादरले रोहिणी गाव ! : चौघा मृतांची पटली ओळख

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील रोहिणी गावाजवळ झालेल्या अपघातात चार जण ठार झाले असून तीन जखमी असून यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, या अपघातातील मृतांची ओळख पटली असून एक मयत वाघडू येथील तर तीन कन्नड तालुक्यातील तांदुळवाडी येथील असल्याचे निष्पन्न झाले आहे. या अपघाताने परिसर हादरला असून ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेऊन जखमींना मदत केली.

याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव येथून नांदगाव दिशेने दोन पुरुष, एक महिला व एक बालिका दुचाकीवरून (क्र. एम.एच. ०२ इबी ६४७६) जात होते. दरम्यान तालुक्यातील रोहिणी गावाजवळ नक्षत्र हॉटेलच्या पुढे एका भरधाव वेगाने धावणाऱ्या स्वीफ्ट कारने या दुचाकीला उडविले. या भिषण अपघातात भगवान नागराज पाटील (वय- ३२ रा. वाघडू ता. चाळीसगाव), विलास वसंत मोरे (रा. तांदुळवाडी ता. कन्नड), पत्नी अलकाबाई विलास मोरे व मुलगी रेणूका विलास मोरे (वय- ९) यांचा मृत्यू झाले असून मुलगा अमोल विलास मोरे (वय- ३ वर्ष) हा गंभीर जखमी झाला आहे.

 तर कार मधील तीघे जण गंभीर जखमी झाले आहे. यातील दोन जण जागीच ठार झाले असून एक रूग्णालयात नेताना व एक उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या अपघातातील अमोल विलास मोरे याची प्रकृती चिंताजनक असल्याचे पुढील उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आले आहे. 

हि घटना बुधवार, ३० रोजी ११:३० वाजताच्या सुमारास घडली असून अपघात घडताच परिसरातील ग्रामस्थांसह ग्रामीण पोलीसांनी धाव घेतली. याबाबत सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहेत. सतिष वाल्मिक पाटील यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात फिर्याद उशिरापर्यंत दाखल करणे सुरू होते. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू असणार आहेत.

 

Protected Content