रिक्षा उलटल्याने तीन प्रवासी गंभीर

Road Accident

जळगाव प्रतिनिधी । कारने अचानक ब्रेक लावल्याने किनगाव ते यावल प्रवासी रिक्षा उलटल्याने रिक्षातील तीन जण गंभीर जखमी झाले असून तिघांना जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, नातेवाईकांकडे उत्तरकार्यासाठी रिक्षाने यावलकडे जात असतांना साकळी फाट्याजवळ पुढे जाणाऱ्या कारने अचानक ब्रेक दिल्याने मागून येणारी भरधाव रिक्षा उटल्याने रिक्षातील लताबाई अशोक सुतार (वय-45), मोहन प्रभत कोळी (वय-65) आणि दत्तू प्रभत कोळी (वय-58) तिघे रा. किनगाव हे गंभीर जखमी झाले. तर इतर 5 ते 6 जण किरकोळ जखमी झाले. तिघांना उपचारार्थ जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याबाबत अद्याप पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

Protected Content