जळगाव जिल्हा पोलीस दलातील ५१ कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्या !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा पोलिस दलात ५१ कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या असून तसे आदेश सोमवारी पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी काढले.

पोलिस दलामध्ये कार्यकाळ पूर्ण झालेल्यांसह विनंती बदल्या करण्यात आल्या. त्यानंतर सोमवारी पुन्हा ५१ जणांच्या बदलीचे आदेश काढण्यात येऊन तात्पुरती नेमणूक करण्यात आली आहे. पोलिस मुख्यालयातील संघपाल तायडे व भुसावळ शहर पोलिस ठाण्यातील पोकॉ राहुल महाजन यांची एलसीबीत बदली करण्यात आली आहे. एएचटीयूतील पाच जणांची इतरत्र बदली करण्यात आली आहे. मुख्यालयातील ९ जणांना पोलिस ठाणे मिळाले आहे. सायबर पोलिस ठाण्यातीलदेखील ५ जणांना शहर वाहतूक शाखेत स्थान मिळाले आहे.

Protected Content