मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा किरीट सोमय्या यांना लक्ष्य करत ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नावावर वसुली करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर आज पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. किरीट सोमय्या यांनी मुंबईत पुर्नवसनाच्या नावाखाली ३०० ते ४०० कोटींची वसूली केली असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री आणि आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे तक्रार करणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.
या संदर्भात आज संजय राऊत म्हणाले, सोमय्यांची एक दिवस जनता धिंड काढणार आहे. पुनर्वसनाच्या नावाखाली ४३ बोगस लोकांची घुसखोरी झालीय. ४३३ लोकांकडून प्रत्येकी २५ लाख रुपये घेण्यात आले असल्याचा आरोप त्यांनी केला.
सोमय्यांनी फडणवीस, अमित शहा यांच्या नावावरही वसुली केली आहे. सोमय्यांनी केलेल्या वसुलीची फडणवीसांना कदाचित कल्पना नसावी. पुनर्वसनाचा घोटाळा आहे. फडणवीसांच्या नावावर सोमय्यांनी शेकडो कोटी रुपये गोळा केल्याच्या माझ्याकडे तक्रारी आल्या आहेत. सोमय्यांनी साडेसात हजार कोटींचा घोटाळा केला आहे. मुख्यमंत्री यांची भेट घणार असल्याचेही ते म्हणाले. तर महाआयटी घोटाळ्यातील प्रमुख सूत्रधार अमोल काळे हा देशाबाहेर फरार झाल्याची माहिती देखील त्यांनी याप्रसंगी दिली.