नांद्रा येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील नांद्रा येथील अप्पासाहेब पी. एस. पाटील माध्यमिक विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को. ॲप सोसायटी लि. शेंदुर्णी ता. जामनेरचे सचिव सतिष काशिद यांच्या उपस्थित संपन्न झाला. 

याप्रसंगी नांद्रा येथील माध्यमिक विद्यालयलातून दरवर्षी दहावीचे १५० च्या वर विद्यार्थी उत्तीर्ण होतात त्यातले काही मेरीट ला येऊन वेगवेगळ्या क्षेत्रात शिक्षण घेतात.  पण उर्वरीत ८० टक्के विद्यार्थी कला, वाणिज्य, विज्ञान शिक्षणासाठी शहरी भागात जातात. पण काही गरीब विद्यार्थी असतात त्यांना अपडाऊन व मोठी फी भरणे शक्य नसते याबरोबरच ग्रामीण भागातील मुलींना अपडाऊन सोईचे नसल्याने व खर्चीक असल्याने प्रंसगी शिक्षण मध्येच सोडून द्यावे लागते. तरी आपल्या माध्यमिक विद्यालयाला जोडून उच्च माध्यमिक विद्यालय सुरू करण्याची मागणी पञकार प्रा. यशवंत पवार सह ग्रामस्थ, पालकवर्ग यांनी हा विषय संस्थेच्या सचिवाकडे मांडल्यावर त्यांनी हा विषय तात्काळ मान्य करुन विद्यार्थ्यांना गावातच चांगल्या दर्जेदार उच्चशिक्षण उपलब्ध व्हावे म्हणून यावर्षीच दोन नविन खोल्या उभारुण आपण माध्यमिकला जोडूनच उच्च माध्यमिक विद्यालय दर्जावाढ करुन सुरू करण्याचे आश्वासन दिले.

 याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून दि. शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को. अॉप सोसायटी लि. शेंदुर्णी महिला संचालिका उज्वला सतिष काशिद, स्थानिक सल्लागार समिती अध्यक्ष डॉ. वाय. जी. पाटील, उपाध्यक्ष विश्वनाथ पाटील, आत्माराम पाटील, विनोद पाटील, सुभाष पाटील, नंदकुमार बागुल, पोलिस पाटील किरण तावडे, विनोद तावडे, किशोर खैरनार, महेश गवादे, वसंतराव सुर्यवंशी, ग्रा. प. सदस्य योगेश सुर्यवंशी, पत्रकार राजेंद्र पाटील, यशवंत पवार, किरण सोनार, साहेबराव तावडे, मनोज पाटील, उपसरपंच शिवाजी तावडे, सुभाष तावडे, वसंत बाविस्कर, माजी मुख्याध्यापक डब्लु. एस. पाटील,  एस. पी. तावडे, मुख्याध्यापक आर. एस. चौधरी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दत्तात्रेय देवतेचे पुजन करुन व आचार्य बापुसाहेब गजाननराव गरुड यांच्या पुतळ्याचे पूजन व माल्यार्पण करुन करण्यात आले. मान्यवरांचे वृक्षरोप व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक आर. एस. चौधरी यांनी केले. 

गुणवंत विद्यार्थी सत्कार 

एन. एम. एम. एस. (राष्ट्रीय दुर्बल घटक) परीक्षा एकूण १९ विद्यार्थी पैकी ०५ विद्यार्थी पास झाले तर ४ विद्यार्थी गुणवत्ता यादीत पात्र झाले तर एस. टी. संवर्गात जळगांव जिल्हात प्रथम क्रमांक कु. पल्लवी अशोक कोळी व आठवा क्रमांक कु. पायल ज्ञानेश्र्वर कोळी, कु. मयुरी संजय तायडे, घनश्याम वसंत बाविस्कर पास झाले त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक पी. एस. चौधरी, सौ. व्ही. एस. पाटील, डी. एस. चव्हान यांना सुध्दा सन्मानित करण्यात आले. 

माजी मुख्याध्यापक डब्लु. एस. पाटील, ग्रामस्थ वसंतराव सुर्यवंशी, पत्रकार यशवंत पवार, यांनी समयोचित मनोगत व्यक्त केले. व  इयत्ता ११ वी कला विज्ञान सुरू करण्याची मागणी केली. आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शन सतिष काशिद यांनी अनेक वृक्षसंपदा असलेल्या निसर्गरम्य वातावरणात कार्यक्रम संपन्न होत आहे. मनस्वी आनंद व्यक्त केला. शाळेच्या दोन खोल्या बांधल्या जातील. काही वर्ग खोल्या फरषी बसवन्यात येईल. विद्यार्थी समोर बोलतांना आनंद व्यक्त केला. 

कोविड –  १९ पाद्रुभावमुळे गुणवत्त विद्यार्थी कौतुक केले. त्यांचा आदर्श इतर विद्यार्थी घ्यावा. भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या गावकरी यांचा उत्तम प्रतिसाद व कार्यक्रमांचे उत्तम नियोजन बदल समाधान व्यक्त केले. कोणत्याही उपक्रमा मध्ये योग्य मदतीचे आश्वासन दिले. याप्रसंगी वृक्षारोपण सतिष काशिद व महिला संचालिका उज्वला सतिष काशिद, स्थानिक सल्लागार समिती अध्यक्ष व उपाध्यक्ष विविध संस्थांचे पदाधिकारी सर्व अंगणवाडीच्या सेविका या सर्वांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन ठाकूर यांनी केले तर उपस्थितांचे आभार एल. एम. पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनी यांनी परिश्रम घेतले.

Protected Content