जिल्हा बँकेने शेतकऱ्यांविरोधात घेतलेल्या निर्णयाला अमोल शिंदे यांनी फोडली वाचा

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जळगाव जिल्ह्यात रहिवास असणाऱ्या मात्र जिल्हा हद्दीबाहेर शेजारील जिल्ह्यात शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यात येऊ नये.अशा पद्धतीचा निर्णय घेतला आहे.
या अनुषंगाने भाजपच्या अमोल शिंदे यांनी सदर विषयाला वाचा फोडत या संदर्भात मंत्री गिरीश महाजन यांना निवेदन दिले आहे.

पाचोरा-भडगांव विधानसभा मतदारसंघातील पिंपळगाव हरे., वरसाडे तांडा, सातगाव डोंगरी, वडगाव कडे,अटलगव्हाण, शिंदाड, सार्वे, पिंप्री, खडकदेवळा, चिंचखेडा बु. डोंगरगाव, नगरदेवळा, सिम निपाने, बदरखे, दिघी व इतर काही अशी गावे असुन यांच्या सीमा शेजारील जिल्हा असणाऱ्या छ.संभाजीनगर जिल्ह्याला लागून असल्याने येथील गावातील काही रहिवाश्यांच्या शेतजमिनी या छ.संभाजीनगर जिल्ह्याच्या हद्दीत येतात. त्यामुळे जळगांव जिल्हा बँकेच्या या निर्णयामुळे सदर शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळणार नाही व शेतकरी बांधवांना शेतीसाठी आवश्यक बी-बियाणे, रासायनिक खते व इतर शेतीसाठी लागणारी साधने खरेदी करणे शक्य होणार नाही आणि सदर शेतकरी जिल्हा बँकेतून मिळणाऱ्या या पिक कर्ज योजनेपासून वंचित राहून आर्थिक संकटात सापडतील असे निवेदनाच्या माध्यमातून अमोल शिंदे यांनी मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे मांडून सदर विषयाला वाचा फोडली.

तसेच सदर निर्णयाची माहिती मिळताच त्यांनी क्षनाचाही विलंब न-करता हा निर्णय रद्द होणे अत्यंत गरजेचे असून या निर्णयामुळे संपूर्ण जिल्हयाच्या सीमा भागांतील गावांत राहणारे शेतकरी अडचणीत येऊ शकतात.असे मंत्री गिरीष महाजन यांना भेटून निर्णय रद्द होण्याची आग्रही मागणी केली.मंत्री गिरीश महाजन यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क करत सूचना देऊन हा निर्णय मागे घेण्यास सांगितल्याची माहिती अमोल शिंदे यांनी दिली.

स्थानीक आमदार हे जिल्हा बँकेचे संचालक आहेत मागील काळांत व्हा.चेअरमन पद त्यांनी भूषवले असताना देखील पाचोरा-भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या त्यांच्या का लक्षात येत नाही ? भडगाव येथील शेतकऱ्यांना २०१९ मधील नुकसाभरपाईची मदत ५ वर्ष होऊन गेल्यावर सुद्धा मिळतं नाही.,२१ दिवसांचा पावसाचा खंड पडल्यावर पीक विमा मिळवुन देण्यात आमदार अपयशी ठरलेत, पाचोरा – भडगांव तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आमदार अपयशी ठरलेत,काल- पर्वा मध्ये वादळी- वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे केळी व इतर पिकांचे मोठ्ाप्रमाणावर नुकसान झाले एवढे सगळे होऊन सुद्धा आमदार महोदय फक्त आता कुठल्या गटांत- पक्षात जायचे याचा विचार करत बसले आहेत. परंतु शेतकरी बांधव हुशार आहेत त्यांना आता घरांत बसवल्याशिवाय राहणार नाहीत.असा घणाघात शिंदे यांनी केला.

जेव्हा – जेव्हा गरज पडेल तेव्हा पाचोरा- भडगांव तालुक्यांतील शेतकऱ्यांसाठी हा त्यांचा पूत्र अमोल शिंदे मैदानात उतरेल. अशी ग्वाही पत्रकारांशी बोलतांना दिली व मंत्री गिरीष महाजन यांनी संपूर्ण जिल्हयातील शेतकऱ्यांचा हा अडचणीचा विषय मार्गी लावल्या बद्दल त्यांचे आभार देखील व्यक्त केलेत. याप्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप पाटील पंचायत समितीचे माजी सभापती व तालुका सरचिटणीस बन्सीलाल पाटील,शहराध्यक्ष दीपक माने, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, समाधान मुळे, मुकेश पाटील, जगदीश पाटील, किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष विजय महाजन, योगेश ठाकूर, रोहन मिश्रा, अमोल नाथ आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content