रावेरात रथोत्सव: महिलांना रथ ओढण्याचा मिळाला मान

raver news

रावेर प्रतिनिधी । दत्तात्रय महाराज की जय.. डीगंबरा.. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात रावेर शहरातून भगवान श्रीकृष्ण यांच्या रथ परिक्रमेला सुरुवात झाली सुरुवाती महिलांना रथ ओढण्याचा मान मिळाला यावेळी हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात पुष्प आणि रेवडयाची उधळन करीत शहरातील प्रमुख मार्गावरुन रथोत्सव सुरु होता.

रावेर शहरातील श्रीदत्त जयंती व रथोत्सवाला सुमारे 181 वर्षाची परंपरा असून येथील रथाची श्रीरंग कुलकर्णी यांनी सह पत्नी दिपिका कुलकर्णी यांच्या सोबत विधिवत पूजा करून पूजा-हवन करून सुरुवात झाली यावेळी सहकारी म्हणून संजय मटकरी आशिष कुलकर्णी, ऋषिकेश महाराज, विद्यमान गादीपती श्रीपाद कुलकर्णी, आदीनी सहकार्य केले यावेळी रथाला मोगरी लाऊन दिशा देण्याचे काम कैलास कासार, भूषण कासार, निलेश पाटील, मुकेश पाटील, मधुकर कासार, मधुकर कासार, मंगसूर लोहार, संजय लोहार, राहुल महाजन, यांनी दिले यावेळी उपनगराध्यक्ष असदउल्ला खा. नगर सेवक सादिक मेंबर, माजी नगराध्यक्ष पदमाकर महाजन, नितिन पाटील, हरीष गनवाणी शैलेंद्र अग्रवाल, अरुण शिंदे, डी डी वाणी, अशोक शिंदे, दिलीप कांबळे, किशोर वाणी, यूसुफ खान, आदी मिरवणूक यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत होते.

रेवडया व पुष्प पाकळ्यांची उधळन
श्री दत्त जयंती निमित्त प्रसाद म्हणून गुळ, तीळ, द्वारे तयार करण्यात येणा-या रेवडयाची रथोत्सव मिरवनुकीवर उधळन केली जात होती. यासाठी महाराष्ट्रभर नोकरी निमित्त गेलेले रावेरकर शहरात येतात तसेच प्रसाद म्हणून अनेक भाविक रेवड्याचीं उधळण करण्यात आली.

रथोत्सवाला तगडा बंदोबस्त
पोलिस उपविभागीय अधिकारी नरेंद्र पिंगळे, पोलिस निरिक्षक रामदास वाकोडे यांच्या नेत्वता 28 आरसीपी प्लाटून – पाच पोलिस अधिकारी, २८ कर्मचारी असतील. तसेच रावेर येथील २० पोलीस कर्मचारी, ४९ होमगार्ड यांच्यासह एकूण, १२५ कर्मचारी असा बंदोबस्त तैनात असेल.

कृष्णभावनामृत हरी कृष्ण संकीर्तन आकर्षणाचे केंद्र
श्री दत्त जयंती हिंदू धर्मातील एक महत्त्वाचे धार्मिक स्थान असल्याने.आजच्या या रथोत्सव निमित्त आंतर राष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघा तर्फे हरी कृष्ण संकिर्तन आकर्षणाचे केंद्र होते रथाच्या पुढे या संकीर्तनेभक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

आज पालखीचे आयोजन
आज 14 शनिवार रोजी सायंकाळी पालखिचे आयोजन असून सायंकाळी पालखी निघणार असून ही पालखी आठवडे बाजार येथे आल्या नंतर दहीहंडी फोडल्या नंतर फटाक्यांची आतषबाजी होईल हा क्षण बघण्यासाठी तालुक्यातील भाविक रावेरमध्ये दाखल होतो.

रथा खालच्या मातीने मिळतो मोक्ष
भगवान श्रीकृष्ण यांच्या रथाला विविध विधिवत पूजा करून सिध्द केल्या नंतर रथ ओढला जातो या रथाच्या चाका खालची माती कपाळी लावल्यास मोक्ष मिळत असल्याची परंपरा आहे.

रथयात्रे निमित्त लाखोची होते उलाढाल
आठवडाभर चालणा-या यात्रेत लहान मुलांचे खेळने, घर उपयोगी वस्तु, कपडे दुकाने, आकाश पाळणे, फोटो दुकाने यात्रेत लावण्यात आले होते निमित्ताने लाखो रूपयांची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात होते.

Protected Content