जळगाव (प्रतिनिधी) शहरातील रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांची आज तडकाफडकी बदली करण्यात येवून त्यांना पोलीस मुख्यालयात नियुक्त करण्यात आले आहे.
काल मू.जे. महाविद्यालयात झालेल्या खुनाच्या प्रकरणाचे हे पडसाद असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. कालच्या घटनेने शहरात गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला नसल्याची टीका केली जात आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी एका बलात्कारपिडीत महिलेला फिर्याद देण्यासाठी रामानंद पोलीस ठाण्यात रात्री २.०० वाजेपर्यंत बसवून ठेवण्यात आल्याचे प्रकरणही चांगलेच तापले होते. त्यातही पिडीतेने पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला होता. या दोन मोठ्या घटनांनंतर आज जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी आज त्यांची तडकाफडकी मुख्यालयात बदली केली आहे.