जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सहाय्याक क्रीडा संचालक राजेंद्र अर्जुनराव पाटील यांचे काल रात्री निधन झाले.
राजेंद्र पाटील (वय ५६) यांचे काल रात्री दहाच्या सुमारास मुंबई येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचा अंत्यविधी रविवार दिनांक दि.३ रोजी जळगाव येथे होणार आहे. त्यांची अंत्ययात्रा सकाळी ११.३० वाजता शंकर अप्पा नगरातून निघणार असून त्यांच्या पार्थिवावर पिंप्राळा स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.