राहूल गांधी यांनी विरोधीनेते पद स्वीकारावे; काँग्रेस नेत्यांची मागणी

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ९ जून रोजी पंतप्रधान मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्याचवेळी विरोधी पक्षनेते निवडीबाबत दिल्लीत मंथन तीव्र झाले आहे. दिल्लीत काँग्रेस कार्यकारिणीची बैठक सुरू झाली आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणी या वेळी होत आहे. यादरम्यान, खासदारांनी बैठकीत विरोधी पक्षनेतेपदासाठी राहुल गांधी यांच्या नावाची चर्चा केली.

लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस कार्यकारिणीची बैठक आता दिल्लीत होत आहे. या बैठकीत सर्व नवनिर्वाचित खासदारांच्या सहभागासोबतच काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे, प्रियांका गांधी, राहुल गांधी आदींचा समावेश आहे.लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस कार्यकारिणीची बैठक आता दिल्लीत होत आहे. या बैठकीत सर्व नवनिर्वाचित खासदारांच्या सहभागासोबतच काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे, प्रियांका गांधी, राहुल गांधी आदींचा समावेश आहे.

यावेळी सर्वात मोठा विरोधी पक्ष असल्याने काँग्रेसच्या नेत्याला अधिकृतपणे विरोधी पक्षनेतेपद मिळू शकते. नियमानुसार, विरोधी पक्षनेत्याचा दर्जा मिळविण्यासाठी, विरोधी पक्षाकडे एकूण जागांपैकी किमान 10 टक्के जागा असणे आवश्यक आहे. म्हणजेच विरोधी पक्षनेता होण्यासाठी पक्षाकडे 55 जागा असणे आवश्यक आहे, तर काँग्रेसने यावेळी एकूण 99 जागा जिंकल्या आहेत. अशा स्थितीत विरोधी पक्षनेतेपदाची भूमिका निश्चित होऊ शकते.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार प्रमोद तिवारी यांनी निवडणूक निकालानंतर सीडब्ल्यूसी बैठकीत सांगितले की, सभागृहातील विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी खूप महत्त्वाची आहे. अशा स्थितीत राहुल गांधींनी ही जबाबदारी घ्यावी. बैठकीसाठी दिल्लीत पोहोचलेले खासदार कुरियाकोसे यांनीही राहुल गांधी विरोधी पक्षनेते होतील, अशी आशा व्यक्त केली आहे.

Protected Content