राहुल गांधींनी राजा-महाराजांचा अपमान केला; देवेद्र फडणवीसांचा जोरदार पलटवार

मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा | नागपूरातील काँग्रेसच्या सभेतून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार टीका केली. यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही त्यांच्यावर जोरदार पलटवार केला. सभेसाठी तेलंगणातून माणसे आणली होती. काँग्रेसच्या सभेला अनेक खुर्च्या रिकाम्या होत्या. राहुल गांधीना लोक गांभिर्याने घेत नाहीत तर आम्ही का घेऊ असे म्हणत त्यांनी राहुल गांधींची टीका केली.

ती महारॅली नव्हतीच ती सुक्ष्म रॅली होती. राहुल गांधींच्या भाषणाआधी अनेक लोक सभा सोडून निघून गेले असे फडणवीस म्हणाले. ते म्हणतात ‘हम तैयार है’ पण ते कशासाठी तयार आहेत असे समजत नाही असं म्हणत त्यांनी टीका केली.

मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटलं. देशातील अनेक शूर राजे आणि घराण्‍यांनी इंग्रजांशी संघर्ष केला पण आज राहुल गांधी सरसकट म्हणाले की देशातील राजा-महाराजांनी ब्रिटिशांशी साठगाठ केली होती. अशा प्रकारे राजघराण्यांचा अपमान करणं चुकीचं आहे. हे महाराष्ट्रात किंवा देशात कोणीही सहन करणार नाही असे फडणवीस म्हणाले.

Protected Content