विधानसभा निवडणुकीच्या निकालावर उद्या पावसाचे सावट

rain

मुंबई वृत्तसंस्था । राज्यात सध्या परतीच्या पावसाने झोडपले असून उद्या होणाऱ्या मतमोजणीवरही पावसाचे सावट आहे. तसेच या अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान होत आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून पुढील आणखी ४ दिवस पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

मुंबई, पुणे, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात २८ ऑक्टोबर पर्यंत पाऊस सुरू राहिल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे. गेल्या २४ तासांमध्ये कोकण आणि गोव्यातील काही भागांमध्ये मुसळधार तर काही भागांमध्ये तुरळक पावसाची नोंद करण्यात आली. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली.

दरम्यान, २५ ऑक्टोबर रोजी कोंकण आणि गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर विदर्भातही मेघघर्जनेसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये किरकोळ सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोमवारी मराठवाडा आणि विदर्भ वगळता अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. तर पुण्यात सोमवारी ४२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. मंगळवारी दिवसभरात राज्यात पावसाने दडी मारली. मात्र, रात्री ९ नंतर पावसानं पुन्हा हजेरी लावली.

Protected Content