राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरेल : जयंत पाटील

jayant patil

 

मुंबई (वृत्तसंस्था) विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी पक्ष पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरेल असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. श्री. पाटील यांनी राज्यात पुन्हा एकदा भाजपा-शिवसेना युतीचे सरकार येण्याचे अंदाज दाखविणारे एक्झिट पोलचे दावे फेटाळून लावले आहेत.

 

एक्झिट पोलमध्ये राज्यात पुन्हा एकदा भाजपा-शिवसेना युतीचे सरकार येईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र जयंत पाटील यांनी एक्झिट पोलचा अंदाज मोडीत काढत राष्ट्रवादीला घवघवीत यश मिळेल असा दावा केला आहे. यावेळी जयंत पाटील यांनी शरद पवारांच्या सभांना मिळालेला प्रतिसाद पाहता आपल्याला याची खात्री असल्याचे त्यांनी सांगितले आहे. एवढेच नव्हे तर, एक्झिट तसंच ओपिनियन पोलमधील निष्कर्ष एकतर्फी असून काहीतरी गडबड असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच एक्झिट पोलच्या माध्यमातून एकच बाजू वरचढ दाखवली जात असून, लोकांची त्याप्रमाणे मानसिक तयारी करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा, दावा त्यांनी केला आहे.

Protected Content