अखेर ठरले….काँग्रेस व राष्ट्रवादीचे शिवसेनेला पाठींब्याचे पत्र !

sena congress bjp

मुंबई प्रतिनिधी । शिवसेनेच्या सरकारला राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने पाठिंब्याचे पत्र दिल्यामुळे आता राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच संपुष्टात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आज सकाळपासून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या बैठकांवर बैठका झाल्या. आज दुपारी दिल्लीत काँग्रेसची तर मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली. या दोन्ही बैठकांमध्ये शिवसेनेच्या सरकारला पाठींबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. यात राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमध्ये सहभागी होणार असल्याचे संकेत असले तरी काँग्रेसने तूर्तास बाहेरून पाठींब्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, शिवसेनेचे नेते थोड्याच वेळात राज्यपालांची भेट घेऊन पाठींब्यांचे पत्र त्यांना सादर करणार असल्याचे वृत्त आहे.

Protected Content