मुंबई विभागात जोरदार पावसामुळे प्रवाशी रेल्वेगाड्या रद्द

57675 indian railways tw

भुसावळ प्रतिनिधी । रेल्वे मुंबई विभागात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस झाल्याने काही भागात पाणी साचले आहे. त्यामुळे भुसावळ- मुंबई आणि मुंबई-भुसावळ प्रवाशी रेल्वेगाड्या दोन दिवसांकरीता रद्द करण्यात आले आहे. तर काही गाड्यांचा मार्ग बदलविण्यात आला आहे.

यात 51154 येणारी भुसावळ- मुंबई पॅसेंजर 29 आणि 30 जून रोजी आणि 51153 जाणारी मुंबई-भुसावळ पॅसेंजर या दोन गाड्या 30 जून आणि 1 जुलै या दोन दिवशी रेल्वे गाड्या रद्द करण्यात आले आहे. तर 29 आणि 30 जून रोजी 11025 हुतात्मा एक्सप्रेस ही कल्याण मार्गे न जात ती मनमाडहून दौड मार्गे पुणे जाणार आहे. तर त्या दिवसातील 11026 पुणे-भुसावळ हुतात्म एक्सप्रेस ही दौघ, मनमाड मार्गे भुसावळला पोहचेल. तरी संबंधित प्रवाश्यांनी यांची नोंद घ्यावी असे आवाहन केले आहे.

Protected Content