नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भारत आणि मालदीवमध्ये सुरू असलेल्या राजकीय वादात आता भारत सरकार मिनिकॉय बेटांवर नवीन विमानतळ बांधणार आहे. येथून लढाऊ विमाने, लष्करी विमाने आणि व्यावसायिक विमाने चालवता येतील अशी योजना आहे. त्यामुळे भारताची लष्करी ताकद वाढेल.
याशिवाय नागरी विमानेही येथे ये-जा करू शकतील. सध्या लक्षद्वीपमध्ये आगती येथे एकच हवाई पट्टी आहे. येथे सर्व प्रकारची विमाने उतरू शकत नाहीत.