मोबाईल धारकांना झटका ; सेवांचे दर वाढण्याची शक्यता

mobile tower 1521791941

 

नवी दिल्ली वृत्तसंस्था । देशातील सर्व टॉप टेलिकॉम कंपन्या 40 टक्के दर वाढ केल्यामुळे वापरकर्त्यांच्या खिशाला कात्री बसली असून टेलिकॉम कंपन्यांकडून आणखी एक बातमी समोर येत आहे की, ‘ट्राय’ सध्या याप्रकरणी समभाग धारकांच्या प्रतिक्रियेची वाट पाहत आहे. त्यानंतरच दरवाढीबाबत निर्णय घेतला जाईल. त्यामुळे येत्या काही आठवड्यांमध्ये ही दरवाढ अजून वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे ती ग्राहकांच्या चिंतेत वाढ करणारी ठरणार आहे.

येत्या काळात ही दरवाढ अजून वाढण्याची शक्यता आहे. कारण टेलिकॉम क्षेत्रातील आर्थिक नुकसान भरुन काढण्यासाठी दरवाढ गरजेची असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. टेलिकॉम टॉकच्या एका रिपोर्टनुसार, टेलिकॉम क्षेत्राचा तोटा भरुन काढण्यासाठी टॅरिफ दरवाढ करत राहणं आवश्यक आहे. असे मत सेल्युलर ऑपरेटर असोसिएशन ऑफ इंडिया (COAI)चे संचालक जनरल राजन मॅथ्यूज यांनी व्यक्त केलेय. यासोबत, प्रतिग्राहक सरासरी महसूल(ARPU)200रुपये इतका वाढवणे गरजेचे आहे असेही ते म्हणालेत. तसेच सीओएआयने, युजरला गुणवत्तेच्या आधारे नेटवर्क निवडता यावे, यासाठी Floor Price निश्चित करण्याची मागणी ट्रायकडे केली आहे. Floor Price निश्चित झाल्यानंतर एअरटेलला सर्वाधिक फायदा होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. कारण, सध्या भारतात जिओ आणि व्होडाफोन-आयडियाच्या तुलनेत एअरटेल सर्वाधिक चांगली 4G सेवा देत आहे.

 

Protected Content