गुलाबभाऊंवर आशीर्वाद कायम ठेवा ; तौसीफ पटेल यांचे भावनिक आवाहन

3e7f89a3 c4ef 4c15 b86b 014908c02f1a

 

धरणगाव (प्रतिनिधी) राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी संपूर्ण जीवन जळगाव ग्रामीण मतदार संघातील जनतेसाठी समर्पित केले आहे. गुलाबभाऊंच्या आशीर्वादामुळं माझे वडील स्व.सलीमभाई पटेल यांनीही आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत धरणगावकरांची सेवा केली. त्यामुळेच आज धरणगाव शहरात विविध विकास कामे आपल्या समोर आहेत. ही विकास गंगा अशीच अविरत सुरु राहण्यासाठी पुन्हा एकदा ना. पाटील यांना विजयी करण्याचे भावनिक आवाहन तौसीफ पटेल यांनी केले आहे.

 

धरणगावकरांनी कायमच गुलाबभाऊंना आशीर्वाद दिलाय. माझ्या वडिलांना देखील धरणगावकरांनी भरभरून प्रेम दिले. त्यामुळे सलीमभाई यांचा मुलगा म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो. मला विश्वास आहे यावेळीही धरणगावकर शिवसेनेला मतदान करतील आणि आपला आशीर्वाद गुलाबभाऊंवर कायम ठेवा, असे देखील तौसीफ पटेल यांनी म्हटले आहे.

 

गुलाबभाऊंच्या मार्गदर्शनामुळे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला धरणगावचा जल शुद्धीकरण प्रकल्प मार्गी लागला. संपूर्ण शहरात कॉंक्रीटीकरण, डांबरीकरण झाले आहे. अनेक ठिकाणी प्लेव्हरब्लॉक बसविले. आज धरणगाव शहरात कुठेही रस्त्यांचा अभाव नाही. शहरात नवीन स्मशानभूमी बांधल्या. एवढेच नव्हे, तर समाजिक बांधिलकी म्हणून प्रत्येक राष्ट्रपुरुष, संत यांच्या पुण्यतिथी,जयंती धरणगाव पालिकेत अभिवादन सभा घेतली जाते. धरणगाव शहरातील आतापर्यंत झालेला विकास फक्त गुलाबभाऊंमुळे शक्य झाला आहे. भविष्यात धरणगाव शहरात अनेक विकास कामे करावयाची आहेत. त्यासाठी पुन्हा एका गुलाबभाऊंना निवडून द्या,असे आवाहन तौसीफ पटेल यांनी केले आहे.

Protected Content