पाच लाखांसाठी विवाहितेचा छळ

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नवीन व्यवसाय करण्यासाठी माहेरहून पाच लाख रूपये आणावे, यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सिंधी कॉलनीतील माहेर आलेल्या रिया शंकरलाल राजपाल(वय-२०) यांच्या विवाह गल्लीतील राहूल अशोककुमार तलरेजा यांच्याशी रितीरिवाजानुसार विवाह झाला. लग्नाचे सुरूवातीचे दिवस चांगले गेले. त्यानंतर पती राहूल याने विवाहितेला माहेरहून ५ लाख रूपये आणावे यासाठी तगादा लावला. दरम्यान, माहेरीची परिस्थीती हालाखीची असल्याने पैश्यांची पुर्तता करून शकली नाही याचा राग मनात ठेवून पती, सासु, दोन नणंद यांनी पैशांसाठी गांजपाठ केला. या छळाला कंटाळून माहेरी आईवडीलांकडे निघून गेल्या. गुरूवार ९ जून रोजी सायंकाळी ७ वाजता विवाहितेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली.

त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात पती राहूल अशोककुमार तलरेजा, सासू आशा अशोक तलरेजा दोन्ही रा. सिंधी कॉलनी, नणंद पुजा हरिष ननकानी रा. पुणे आणि नणंद वैशाली प्रदीप चावला रा. चाळीसगाव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रदीप पाटील करीत आहे.

 

Protected Content