महालक्ष्मी एक्सप्रेसमधील प्रवासी अडकले

mahalaxmi express in flood

मुंबई प्रतिनिधी । जोरदार अतिवृष्टीमुळे ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे महालक्ष्मी एक्सप्रेस अडकून पडली असून यातील प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे.

याबाबत वृत्त असे की, कालपासून मुंबईसह परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर जोरदार पावसामुळे ठाणे जिल्ह्यातील बदलापूरजवळ असणार्‍या वांगणी येथे महालक्ष्मी एक्सप्रेस अडकून पडली आहे. ही रेल्वे गाडी नदीच्या जवळ असल्यामुळे रूळांवर पाणी साचले असून ते डब्यात शिरण्याच्या मार्गावर असल्याने प्रवासी घाबरून गेले आहेत. एनडीआरएफच्या पथकांनी बचाव कार्यास प्रारंभ केला असला तरी यात अडथळे येत असल्याचे वृत्त आहे.

आज सकाळपासून महालक्ष्मी एक्सप्रेसपर्यंत पोहचण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. वेळ पडल्यास हेलीकॉप्टरची मदत घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

Protected Content