पाऊस येण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे महादेवाला साकडे

वरणगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यामध्ये सध्या पावसाने महिनाभरापासून दंडी मारली आहे. हातातोंडाशी आलेली पिके करपून चालली आहे. दरम्याान, पाऊसाने हजेरी लावावी, यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसने पाऊस पाडण्यासाठी आज वरणगाव येथील शंभू महादेवाच्या पिंडीवर पाण्याचा अभिषेक केले आहे.

एक महिन्यापासून जळगाव जिल्ह्यामध्ये पावसाने दडी मारली आहे त्यामुळे शेतात आलेले कपाशी तूर उडीद मूग इत्यादी पिके करपून चालले आहेत म्हणून भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील राष्ट्रवादी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने शंभू महादेवाला पावसासाठी साकडे घातले आहे समजून महादेवाच्या पिंडीवर ती पाण्याचा व दुधाचा अभिषेक घालण्यात आलाय आरती करून महादेवाला साकडे घातले की बाबा लवकरात लवकर पाऊस पडू दे व बळीराजाचे संकट कळू दे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली आहे

प्रतिभाताई तावडे जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रंजना ताई पाटील शहराध्यक्ष अरूणा इंगळे, माजी नगराध्यक्ष रोहिणी जावळे, माजी नगरसेविका प्रतिभा चैाधरी, माजी नगरसेविका वैशाली मराठे, प्रतिभा सोनवणे, निर्मला शेळके, उषा तावडे, श्रद्धा गायकवाड यांच्यासह आदी महिला उपस्थितीत होत्या.

Protected Content