मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात सर्वांनाच प्रतिक्षा असलेला मान्सून अखेर कोकणात दाखल झाला आहे. या वर्षी महाराष्ट्रात तो काहिसा उशिराने दाखल झाला आहे. येत्या काही दिवसात संपूर्ण राज्यातही मान्सून हजेरी लावणार असल्याचा अंदाज आहे.
मागील आठवड्यात आलेल्या ‘वायू’ वादळामुळे मान्सूवर परिणाम होणार असल्याची शक्यता त्यावेळी वर्तवण्यात येत होती. शिवाय, ‘वायू’ वादळानंतर झालेल्या बदलामुळे मान्सून दाखल होण्यास उशीर लागणार असल्याचे वृत्त होते. मात्र सगळे आडाखे खोटे ठरले असून आज हवामान खात्याने मान्सून कोकणातील आणि दक्षिण-मध्य महाराष्ट्रातील भागात दाखल असल्याचे जाहीर केले आहे. आगामी दोन-तीन दिवसात राज्यातील अन्य काही भागातील हवामान पावसासाठी अनुकूल असणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.