जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र विधान परिषद दिवार्षिक निवडणूक २०२६ ची घोषणा करण्यात आली असून जिल्ह्यात आजपासून २५ जून २०२६ पर्यंत निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असून तिची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक शाखेतर्फे प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.




