रामेश्‍वर कॉलनीतील महिलेची रेल्वेखाली आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी । शहरातील रामेश्‍वर कॉलनी भागातील रहिवासी असणार्‍या महिलेने आज दुपारी आसोदा रेल्वेगेट ते भादली दरम्यान धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

याबाबत वृत्त असे की, रामेश्‍वर कॉलनीतील रहिवासी असणार्‍या विमलबाई काशिनाथ चौधरी (वय५५, रा. रामेश्‍वर कॉलनी) यांनी आज आसोदा रेलवेगेट ते भादली दरम्यान रेल्वे खांबा ४२१/२३-२५ च्या मध्ये धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केली. ही घटना दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन पार्थिव जिल्हा रूग्णालयाकडे रवाना केले.

दरम्यान, मयत महिलेच्या पश्‍चात पती, मुलगा, दोन विवाहित मुली आहेत. हे कुटुंब भाजीपाला विक्रेते म्हणून काम करत होते. या महिलेने नेमकी कोणत्या कारणासाठी आत्महत्या केली याचे कारण अद्याप समजले नाही. दरम्यान, शनिपेठ पोलिसांनी याचा पंचनामा केला असून याबाबत नोंद करण्याचे काम सुरू होते.

Protected Content