अभाविपची जळगावात पर्यावरण पूरक दिवाळी

जळगाव प्रतिनिधी । अखील भारतीय विद्यार्थी परिषदेच्या जळगाव शाखेचे दिपोत्सवाला पर्यावरण पूरक पध्दतीत साजरा करत वृक्षारोपण केले.

यंदा कोरोनाच्या आपत्तीमुळे दिवाळी साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या पार्श्‍वभूमिवर, अखील भारतीय विद्यार्थी परिषदेने दिवाळी निमित्त पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी खास उपक्रम राबविला. याच्या अंतर्गत एबीव्हीपी जळगाव महानगराच्या वतीने दिवाळीनिमित्त वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धनाचा कार्यक्रम मेहरुण तलाव याठिकाणी करण्यात आला तसेच प्रदूषणमुक्त दिवाळीचा संकल्प या ठिकाणी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी घेतला.

यावेळी जळगाव जिल्हा संयोजक रितेश चौधरी महानगर मंत्री आदेश पाटील, पवन भाई, संकेत सोनवणे, चिराग तायडे, पियुष मनियार, जितेश चौधरी, चैतन्य बोरसे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content