जळगावात पूर्ववैमनस्यातून पती-पत्नीवर प्राणघातक हल्ला

jalgaon news

जळगाव प्रतिनिधी । पूर्ववैमनस्यातून अचानकपणे चार ते पाच जणांनी घरात येवून पती-पत्नीच्या डोक्यात बियरच्या बाटल्या फोडून आणि चाकू लावत जीवघेणा हल्ला केल्याची घटना आज सायंकाळी एकनाथ नगरात घडली. यात पती-पत्नी गंभीर जखमी झाले असून दोघांना जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मेहरूण परीसरातील एकनाथ नगरातील रहिवाशी अंबादास सुकदेव वंजारी (वय-45) हे आपल्या पत्नी सुनिता अंबादास वंजारी (वय-40) सह दोन मुले व दोन सुनांसह राहतात. 10 वर्षांपुर्वी त्याच गल्लीत राहणाऱ्या एका तरूणाने पुर्ववैमनस्येतून आज सायंकाळी 4.30 वाजेच्या सुमारास ॲपे रिक्षात चार ते पाच साथीदारांसह अंबादास वंजारी यांच्या घरी येवून मागील भांडण काढत घरासमोर सुनिता ह्या बसलेल्या असतांना त्यांच्या डोक्यात बियरच्या बाटल्या फोडल्या. आपल्या पत्नीला मारहाण करत असल्याचे पाहून अंबादास हे धावून आले असता त्यातील एकाने फायटरने त्यांच्या दोन्ही डोक्यांवर वार केले तर त्यांच्या डोक्यात बियरच्या बाटल्या फोडल्या. दरम्यान घरात असलेल्या मोठा मुलगा राहूलची पत्नी ही गर्भवती असल्याने तिला जमिनीवर ढकलून तिच्या गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची पोत ओरबडून घेतले. हाणामारी केल्यानंतर सर्वजण पुन्हा रिक्षात बसून पळ काढला.

पती-पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याची गल्लीत राहणाऱ्या तरूणांच्या लक्षात आल्यानंतर दोघांना जखमीवस्थेत जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दखल केले. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा एमआयडीसी पोलीसांनी जिल्हा रूग्णालयात धाव घेतली असून अज्ञात हल्लेखोरांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Protected Content