राज्यात कोरोना रुग्ण संख्येसह मृतांच्या आकडेवारीत वाढ

नवी दिल्ली । देशात गेल्या 24 तासात 3 लाख 17 हजार 532 रुग्णांची नोंद झाली आहे. मृतांची संख्या देखील वाढली असून दिवसभरात 491 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे.

कोरोना विषाणू  संसर्गाचं संकट वाढल्यानं अनेक राज्यांनी निर्बंध लागू केले आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून देशात अडीच लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत होती. बुधवारच्या रुग्णसंख्येनं तीन लाखांचा टप्पा पार केला आहे.  गेल्या 24 तासात 2 लाख 23 हजार 990 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार सोमवारी 3 लाख 17 हजार 532 जणांना कोरोना संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. गेल्या 24 तासात 491 जणांच्या मृत्यूची नोंद झाली.

देशातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या देखील वाढली असून 9 हजार 287 वर पोहोचली आहे. राज्यात बुधवारी ओमिक्रॉनच्या 214 रुग्णांची नोंद झाली आहे. धवारी राज्यात 43 हजार 697 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 49 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसभरात 46 हजार 591 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 69 लाख 25 हजार 825 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत

 

Protected Content