शिवाजीनगरात माथेफिरूने दोन दुचाकी जाळल्या; शहर पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  शिवाजी नगरातील हातमजूरी करणार्‍या तरुणाच्या अज्ञात माथेफिरूने दोन दुचाकी जाळल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याबाबत शहर पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील शिवाजी नगरातील लाकुडपेठमधील गल्ली नंबर २ मधील रहिवासी चंदन विलास पाटील हा तरुण हातमजूरी करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करतो. त्या तरुणाने सदाकेश घनश्याम लखवाणी रा. सिंधीकॉलनी यांच्याकडून गेल्या पाच सहा महिन्यांपुर्वी एमएच १९ ऐवाय ६०९० व एमएच १९ डीई ३४८१ क्रमांकाच्या दोन दुचाकी विकत घेतल्या असून त्या दुचाकी अद्याप त्यांच्या नावावर झालेली नाही. त्या दुचाकींचा वापर चंदन व त्याचा भाऊ सागर हा कामावर जाण्या येण्यासाठी करतात.  ८ रोजी रात्रीच्या सुमारास चंदन याने आपल्या दोघ दुचाकी घरासमोर लावल्या होत्या. त्यानंतर जेवण करुन ते झोपून गेले. मंगळवारी मध्यरात्री दीडवाजेच्या सुमारास अज्ञात माथेफिरुने त्यांच्या दुचाकी पेटवून दिल्या.

 

यावेळी परिसरातील नागरिकांनी तात्काळ पाणी टाकून जळत असलेल्या दुचाकी विझविल्या. याप्रकरणी चंदन पाटील याने दिलेल्या तक्रारीवरुन शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास संजय झाल्टे हे करीत आहे.

Protected Content