मानसिक तणावात तरूणाने घेतली विहिरीत उडी

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील महेलखेडी येथील एका तरूणाने मानसिक तणावातून विहिरीत उडी घेत आपली जीवनयात्रा संपविल्याची दुदैवी घटना समोर आली आहे. याबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, महेलखेडी येथील रहीम बिस्मिल्ला देशमुख (वय २४) या तरूणाने सोमवारी ३१ ऑक्टोबर रोजी कोरपावली शिवारातील विलास भागवत पाटील यांच्या शेतातील विहीरीत उडी घेवुन पाण्यात बुडून आत्महत्या केली. रहीम देशमुख हा तरूण सोमवार सायंकाळच्या ५ वाजेपासुन घराबाहेर निघाला होता, तो रात्री घरी न आल्याने कुटुंबातील मंडळींनी गावातील वनांतेवाईकांकडे शोध घेतला असता तो मिळाला नाही. मंगळवारी १ नोव्हेबर रोजी पुन्हा महेलखेडी गावच्या गावठाण शिवारात त्याचे नातेवाईक शोध घेत असतांना विलास पाटील यांच्या शेतातील विहीरी जवळ त्याची चप्पल दिसुन आली. शोध घेणाऱ्यानी विहीरीत डोकावुन पाहीले असता विहीरीच्या पाण्यात त्याचा मृतदेह दिसुन आला. रहीम देशमुख याचा ६ महीन्यापुर्वीच लग्न झाले होते. लग्नाच्या तिन महीन्यानंतरच त्याची फारकत झाल्याने विवाहीत जिवन पत्नीच्या घटस्फोटाने संपुष्टात आल्याने तो मागील काही दिवसापासुन मानसिक तणावाखाली होता, असे बोलले जात आहे. याबाबत यावल पोलीस ठाण्यात मयताचे काका अब्दुल फतु देशमुख यांनी खबर दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत रहीम देशमुख यांच्या मृतदेहावर यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन देशमुख यांनी केले.

Protected Content