झारखंडमध्ये अंधश्रद्धेतून 4 जणांची गळा चिरून हत्या

D rYQFWwAEsqxe

 

गुमला (वृत्तसंस्था) झारखंडच्या गुमला जिल्ह्यात अंधश्रद्धेतून 4 जणांची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.

 

या संदर्भात अधिक असे की, गुमला जिल्ह्यातील सिसकारी गावात शनिवारी 10 ते 12 लोकं काठ्या आणि धारदार हत्यारं घेऊन आले होते. त्यांनी तीन दरवाजे उघडायला लावले. त्यातील चार जणांना आपल्या ताब्यात घेतले आणि त्या तीन घरांना टाळं लावले. चारही जणांना बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर गळा चिरून त्यांची हत्या केली. ज्या लोकांची हत्या करण्यात आली आहे ते जादूटोणा करत असल्याचा संशय होता. 60 वर्षीय चापा उरांव, त्यांची पत्नी पीरा उराईन यांच्यासह गावातील इतर दोन लोकांची हत्या करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच झारखंड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मारहाण आणि हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाले आहेत. गावातील अनेक घरांना टाळे लावून ग्रामस्थ बाहेर निघून गेले आहेत. त्यामुळे पोलीस सरपंचाकडे याप्रकरणाची चौकशी करत आहेत.

Protected Content