जळगाव जिल्ह्यात 21 नोव्हेंबरपर्यंत जमावबंदी आदेश लागू

जळगाव (प्रतिनिधी) आगामी सण, उत्सव, पुण्यतिथी, जयंती लक्षात घेता जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी. याकरीता संपूर्ण जिल्ह्यात 21 नोव्हेंबरपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत.

आगामी सण, उत्सव, पुण्यतिथी, जयंती लक्षात घेता 21 नोव्हेंबर, 2019 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (3) अन्वये पाच किंवा अधिक लोकांचा जमाव करण्यास पोलीस अधिक्षक, जळगांव यांचे पुर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. जमाव बंदी आदेशातून लग्न मिरवणुका, धार्मिक मिरवणुका, प्रेतयात्रा यांना वगळण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी वामनराव कदम यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Protected Content