चांगलं काम केलं तर नोटीस मिळत नाही – फडणवीस

इस्लामपूर प्रतिनिधी । चांगलं काम केलं तर कुणाला नोटीस मिळत नाही, त्यामुळे जर चांगलं काम केलं असेल आणि कुठलीही चूक नसेल तर कुणी घाबरण्याचं कारण नाही. असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. या माध्यमातून त्यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावल्याप्रकरणी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  चांगलं काम केलं तर कुणाला नोटीस मिळत नाही, त्यामुळे जर चांगलं काम केलं असेल आणि कुठलीही चूक नसेल तर कुणी घाबरण्याचं कारण नाही. असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

भाजपाच्या आत्मनिर्भर यात्रेच्या समारोप कार्यक्रमानंतर इस्लामपूरमध्ये माध्यमांनी विचारलेल्या विविध प्रश्‍नांवर फडणवीस यांनी उत्तर दिलं. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर आदींची उपस्थिती होती.

 

Protected Content