धडधडीत खोट बोलतांना मुख्यमंत्र्यांची जीभ कशी थरथरत नाही : धनंजय मुंडे

munde fadnavis

मुंबई प्रतिनिधी । आमच्या सरकारवर कोणताच डाग नसल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीवरील चर्चासत्रात केला होता. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी जोरदार प्रहार केला आहे. धडधडीत खोट बोलतांना मुख्यमंत्र्यांची जीभ कशी थरथरत नाही, असा थेट प्रश्न त्यांनी विचार आहे.

आमच्या सरकारवर कोणताच डाग नाही, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यावर राष्ट्रवादीकडून टीका करण्यात आली आहे. खोटं बोलताना मुख्यमंत्र्यांची जीभ कशी थरथरत नाही, असा प्रश्न विचारण्यात आला आहे. तुमचं सरकार तर सर्वात कलंकित आहे. म्हणूनच प्रकाश मेहता यांना घरी जावं लागलं नाही का? असा प्रश्न त्यांनी उपस्थितीतांना केला. खोटी कागदपत्रे सादर करून शेतकऱ्यांचे अनुदान लाटल्याचा लोकायुक्तांनी ठपका ठेऊनही सुभाष देशमुख यांना तुम्ही मंत्रिपदावरून काढू शकला नाहीत. अजून बऱ्याच भ्रष्ट मंत्र्यांनी घरचा रस्ता पकडला असता, मात्र तुमच्या कृपादृष्टीने त्यांना तारले आहे, अशी देखील टीका त्यांनी यावेळी केली.

Protected Content