दहा लाखांसाठी विवाहितेचा छळ; गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जळगाव शहरातील सदगुरू नगरातील माहेर असलेल्या विवाहितेला घर घेण्यासाठी १० लाख रूपयांची मागणी करत छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जळगाव शहरातील हनुमान नगर परिसराच्या सदगुरू नगरात माहेर असलेल्या सायली संदीप माळी (वय-२८) यांचा विवाह नाशिक येथील संदीप श्रीराम माळी याच्याशी रितीरिवाजानुसार झालेला आहे. लग्नाचे सुरूवातीचे दिवस चांगले गेले. परंतू त्यानंतर पती संदीप माळी याने विवाहितेला घर घेण्यासाठी माहेरहून १० लाख रूपयांची मागणी केली. तसेच विवाहितेच्या वडीलांच्या मालमत्तेत हिस्सा मागण्यास सुरूवात केली. परंतू विवाहितेच्या वडीलांची परिस्थीती हालाखीची असल्याने पैसे आणले नाही. म्हणून पतीसह सासू, नणंद यांनी शारीरिक व मानसिक छळ केला. हा प्रकार घडल्यानंतर विवाहिता जळगावातील सदगुरू नगरात माहेरी निघून आल्या. मंगळवारी २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती संदीप श्रीराम माळी, सासू अनिता श्रीराम माळी, नणंद शैला आधार महाजन रा. भडगाव, नणंद भाग्यश्री ज्ञानेश्वर जाधव आणि नंदोई भाऊ ज्ञानेश्वर काशिनाथ जाधव रा. नाशिक यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ दत्तात्रय बडगुजर करीत आहे.

Protected Content