विवाहितेला पैशांसाठी मारहाण करत छळ

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सुयोग कॉलनी येथे माहेर असलेल्या विवाहितेला प्लॅट घेण्यासाठी माहेराहून पैसे आणण्याची मागणी करत मारहाण करून छळ केल्याबाबतची तक्रार मंगळवारी २१ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील सुयोग कॉलनी येथे माहेर असलेल्या चेतना अभिनव तायडे (वय-२२) यांचा विवाह भुसावळ येथील  गजानन नगरात राहणारे अभिनव अनिल तायडे यांच्यासोबत रितीरिवाजानुसार झालेला आहे. लग्नाच्या सुरुवातीची काही दिवस चांगले गेल्यानंतर विवाहितेला किरकोळ कारणावरून टोमणे मारणे सुरू झाले. त्यानंतर तिला माहेराहून फ्लॅट घेण्यासाठी पैसे आणावे अशी मागणी केली. दरम्यान विवाहितेने माहेराहून पैसे आणले नाही. या रागातून पती अभिनव तायडे याने शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच घरातील सासू, सासरे, नणंद यांनी देखील पैशांसाठी विवाहितेचा छळ केला. हा प्रकार सहन न झाल्यामुळे विवाहितेने माहेरी सुयोग कॉलनी येथे निघून आल्या. त्यानंतर त्यांनी मंगळवार २१ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. त्यानुसार पती अभिनव अनिल तायडे, सासरे अनिल बाबुराव तायडे, सासू मंगल अनिल तायडे, ननंद गायत्री दीपक कोळी सर्व रा. भुसावळ या चार जणांविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील पाटील करीत आहे.

Protected Content