कोथळी येथे बीजप्रक्रिया विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत‎ डॉ. उल्हास पाटील कृषि‎ महाविद्यालय जळगाव येथील विद्यार्थीनी प्रेरणा बाविस्कर, दिप्ती चऱ्हाटे, समृद्धी कडू, कल्याणी महाले, तेजस्विनी निकम, खुशबू पाटील, दीक्षा सोनवणे, स्नेहल इरसे यांनी‎ कोथळी ता.‎ मुक्ताईनगर गावाला भेट देऊन‎ तेथील शेतकऱ्यांना बीजप्रक्रियेबद्दल‎ माहिती दिली. आता खरीप‎ हंगामाला सुरुवात झाली आहे.‎

खरीप हंगाममध्ये कापूस, भुईमुग व तूर ही पिके प्रामुख्याने घेतली‎ जातात. या बियाण्यांची बीज प्रक्रिया‎ करणे खूप महत्त्वाचे असते पिकावर‎ येणारे रोग जे जमिनीच्या माध्यमातून‎ बियाण्यांवर होतात अशा रोगांपासून‎ तसेच किडीपासून पिकांचे संरक्षण‎ करण्यासाठी बीजप्रक्रिया महत्वाची‎ असते. बीजप्रक्रियेमुळे जास्तीचा‎ होणारा फवारणीचा खर्च कमी होऊ‎ शकतो. बीज प्रक्रिया केल्यामुळे‎ निरोगी वाढ होऊन उत्पादनात वाढ‎ होते. त्यामुळे बीज प्रक्रिया ही‎ पिकाच्या पेरणीसाठी खूप महत्त्वाचे‎ आहे, असे सांगण्यात आले.‎ त्यावेळी गावातील शेतकरी‎ सुनंदा नारखेडे, उर्मिला चौधरी,‎ उषा राणे आदी उपस्थित होते.‎

Protected Content