संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने समाज बांधवांतर्फे अभिवादन

अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘अमळनेर युवा परीट धोबी मंडळ’ व ‘परदेशी धोबी समाज यांच्या संयुक्त विद्यामानाने ‘जीवन श्री व जीवन ज्योती ब्लड बँक अमळनेर’ यांच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समाज बांधवांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

गोपाला गोपाला देवकीनदंन गोपाला या भजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सर्वप्रथम संत गाडगेबाबा उद्यानात श्री संत गाडगेबाबा यांच्या स्मारकाचे व नंतर संत गाडगेबाबा चौकातील स्मारकाचे पूजन व मार्ल्यापण माजी उपनगराध्यक्ष चंदूसिंग परदेशी, माजी नगरसेवक परशुराम महाले, अरुण जाधव, परीट मंडळाचे अध्यक्ष रवींद्र जाधव, सचिव विजय वाघ, परदेशी समाजाचे अध्यक्ष चंदूभाऊ परदेशी, अविनाश जाधव‌, प्रा.अनिल पवार, प्रा. अनिल वाल्हे, सतिश पवार, डॉ योगेश महाले, लक्ष्मण परदेशी, राकेश परदेशी, जगतराव निकुंभ यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले प्रसिद्ध समाजसुधारक होते. दीनदलित आणि पीडितांच्या सेवेसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य दिले. लोक प्रबोधनाचा एक भाग त्यांचे कीर्तन असायचे. सामाजिक रूढी आणि परंपरेच्या टीका त्यात असायच्या. त्यांनी समाजाला शिक्षणाचे महत्व पटवून दिले आणि स्वच्छता आणि चारित्र्याची शिकवण दिली. “देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराण, मंत्र-तंत्र, चमत्कार सारख्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका.” ही त्यांची शिकवण होती. माणसातच दैव आहे असे त्यांचे मत होते. ह्याचाच शोध ते घेत होते. समाज कार्यासाठी मिळालेल्या देणगीतून त्यांनी अनाथ लोकांसाठी अनाथालय, धर्मशाळा, आश्रम, विद्यालय सुरू केले. दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचा साठी देव होते. त्यांच्या सेवेमध्येच जास्तच जास्त काळ वेळ रमायचे.

त्यांनी आपल्या कीर्तनातून सांगितले “देव दगडात नसून तो माणसांत आहे” हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य दिले रक्तदात्यांना अमळनेर युवा परिट धोबी मंडळाच्या वतीने राष्ट्रसंत गाडगेबाबांची प्रतिमा भेट देण्यात आली. सदर कार्यक्रमास गंगाराम वाल्हे, ‌किशोर महाले, अनिल वाघ, गणेश नेरकर, भरत जावदेकर, उमेश वाल्हे ,अनिल मांडोळे, मधुकर निंबाळकर, दिपक सुर्यवंशी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन दिपक वाल्हे यांनी तर आभार परिट मंडळाचे कार्याध्यक्ष विनोद जाधव सर यांनी केले.

Protected Content