मतदार नालायक वागतो म्हणून शासन बेफाम वागते : प्रकाश आंबेडकर

PrakashAmbedkarLivemint kk5C 621x414@LiveMint

अकोला (वृत्तसंस्था) वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजपला मतदान करणाऱ्या नागरिकांविषयी संताप व्यक्त केला आहे. मतदार नालायक वागतो म्हणून शासन बेफाम वागते, असे त्यांनी म्हटले.

 

प्रकाश आंबेडकर बुधवारी अकोला क्रिकेट मैदानावर भारतीय बौद्ध महासभेने आयोजित केलेल्या सभेत बोलत होते. यावेळी आंबेडकर पुढे म्हणाले की, आंध्र प्रदेशातील संघप्रचारकाने देशातील बाँबस्फोटांमध्ये संघाचा सहभाग असल्याचा आरोप केला. मात्र, सरकार गप्प का, असा सवालही आंबेडकर यांनी विचारला. याशिवाय, मुख्यमंत्र्यांनी प्रतिज्ञापत्रात लपवलेल्या गुन्ह्यांविषयी माध्यमांच्या भूमिकेवरही त्यांनी टीका केली. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावरील गुन्ह्यांची माहिती जाहीर करावी, असेही त्यांनी म्हटले.

Protected Content